प्रत्येक मत खेचून आणा – प्रकाश महाराज जवंजाळ
आ. श्वेताताई महाले यांनी केवळ अडीच वर्षात चिखली मतदारसंघात केलेले विकासकार्य खरोखरच उल्लेखनीय आहे. याचे लाभ येणाऱ्या काळात देखील मिळावे यासाठी महायुतीमधील भारतीय जनता पक्षासह सर्वच घटक पक्षांनी एकजूट दाखवून शहर आणि ग्रामीण भागातील प्रत्येक मत श्वेताताईंसाठी खेचून आणावे व सलग दुसरा विजय प्रयत्नपूर्वक साकार करावा असे आवाहन याप्रसंगी भाजपा प्रदेश कार्यकारीणी सदस्य प्रकाश महाराज जवंजाळ यांनी केले.
प्रत्येक कार्यकर्त्याने आपली जबाबदारी पार पाडावी – आ. श्वेताताई महाले
या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर येणार असल्याने चिखली मतदारसंघातून देखील महायुतीलाच विजयी करणे आवश्यक आहे, त्याकरिता महायुतीमधील प्रत्येक घटक पक्षाच्या कार्यकर्त्याने प्रयत्नांची शिकस्त करावी असे आवाहन आ. श्वेताताई महाले यांनी आपल्या भाषणातून केले. ग्रामीण भागातून प्रत्येक सर्कलमध्ये आपल्याला निश्चितच आघाडी मिळेल परंतु ही आघाडी विजयामध्ये रूपांतरित करण्यासाठी चिखली शहरातील प्रत्येक प्रभागामधून सुद्धा आपण मताधिक्य मिळवण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. त्यामुळे कोणीही गाफील न राहता आपण केलेल्या विकास कामांची माहिती शेवटच्या माणसापर्यंत प्रभावीपणे पोहोचवावी, विरोधकांचा अपप्रचार खोडून काढावा व प्रत्येक बुथवर आपल्याला विरोधकावर कशी मात करता येईल यासाठी एकजुटीने प्रयत्न करावा असे आवाहन आ. श्वेताताई महाले यांनी केले.



