चक्री,चक्रवाढ,आणी चक्कर यामध्ये अडकलेले अमडापूर….. कधी ” निर्मळ” होणार ?
बुलढाना: सामाजिक मूल्ये कमजोर झाली की समाज सडायला लागतो.समाज सडवायचा असेल तर सर्वप्रथम नासवली जाते ती तरुणाई! ज्यांची राजकीय,सामाजिक व आर्थिक ताकद या तरुणाईच्या भरोवश्यावर असते ते या तरुणाईला योग्य रस्ता भेटू नये यासाठी सतत प्रयत्नरत असतात.मग रस्ता भटकवण्यासाठी अनेक उपाय योजले जातात.अनेक बेकायदेशीर आणी सामाजिक स्वास्थ बिघडवू शकतील असे “धंदे” सुरु केले जातात.असंच काही प्रकरण अमडापूर आणी इसोली सारख्या आसपासच्या गावामध्ये भर दिवसा सुरु असून त्यामध्ये तरुणाईला बेकायदेशीर मार्गाने पैसा कसा मिळवायचा? त्या पैशाचा उपयोग करून सामाजिक स्वास्थ कसे बिघडवायचे?आणी सामाजिक स्वास्थ बिघडल्यानंतर त्यातून सभ्य,सज्जन आणी इज्जतदार लोकांच्या घरातील इज्जतीवर डोळा ठेवून त्यांच्या प्रतिष्ठेला धोका पोहचेल असे कार्यक्रम कसे केले जातात.याचाच विस्तृत भाग म्हणजे….. चक्री,चक्रवाढ आणी चक्कर यामध्ये अडकलेले अमडापूर होय. यातील पहिला भाग …. “चक्री”…. क्रमश:



